स्थापना - जून १९८६
रजि नं-एस २ न शाळा.को.वि.८०४/६
दि. ०७/०१/१९८७
कै. प्र.ह.देशपांडे आणि सहकार्यांनी श्री. तुळजाभवानी संस्थेची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्राथमिक विद्यालयाची गुणात्मक आणि संस्थात्मक प्रगती होऊ लागली. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकाकडून पुढील शिक्षणाची व्यवस्था करण्याची तीव्र मागणी होऊ लागली म्हणून उरूण सारख्या ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या ठिकाणी संस्थेने जून १९८६ मध्ये 'आदर्श बालक मंदिर हायस्कूल' या माध्यमिक विद्यालयाची सुरुवात केली. इ. ८ वी च्या ३१ विद्यार्थ्यांनी प्रवेश केला. आजरोजी विद्यालयात इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंत प्रत्येकी ४ तुकडया म्हणजे २४ वर्ग तुकडया असून विद्यार्थी संख्या १२१६ (जाने.२०१७) इतकी आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य तन्मयतेने करणारे ३२ अध्यापक व अयापिका कार्यरत असून दोन लिपिक व एक ग्रंथपालासह ८ इतका शिक्षकेतर कर्मचारी वर्ग सेवेत आहे.